नवी दिल्ली आर्थिक अडचणींमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या एअर इंडियाचे अखेर खासगीकरण केले जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. ही कंपनी चालवणे आता अशक्य असून कंपनीला दररोज १५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. कंपनीला २० विमानांची कमतरता जाणवत असून कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे पुरी म्हणाले. मुंबई विमानतळ बंद झालेले नाही अशी माहितीही पुरी यांनी राज्यसभेत दिली. एका धावपट्टीवरून दर तासाला ४५ उड्डाणे होत असत. मात्र आता ३६ उड्डाणे होत आहेत. विमानतळावर काही अडचणी असून त्या लवकरच दूर केल्या जातील असेही पुरी म्हणाले.
https://ift.tt/2J4K9Om
No comments:
Post a Comment