देशात मंदी नाहीच; स्टेट बँक अध्यक्षांचे मत https://ift.tt/2ZqddVI https://ift.tt/2Hsrlay - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, August 25, 2019

देशात मंदी नाहीच; स्टेट बँक अध्यक्षांचे मत https://ift.tt/2ZqddVI https://ift.tt/2Hsrlay

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
वृत्तसंस्था, नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेचे अध्यक्ष यांनी देशात मंदीचे वातावरण असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांच्या मते देशातील काही क्षेत्रांतील मागणीत घट नोंदविण्यात आली आहे. ‘सध्या देशातील वाहन उद्योग संकटात आला आहे, याचा सर्वत्र मंदी आहे असा अर्थ घेणे चुकीचे आहे. सध्या बहुतांश बँकांकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम असून, ही रक्कम अर्थव्यवस्थेत खेळती राहणे महत्त्वाचे आहे,’ असेही कुमार यांनी नमूद केले. ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर विपरित परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम भारतावरही होतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी ३२ उपाययोजनांची घोषणा केली. या उपाययोजना सद्यस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरतील. या उपाययोजनांमुळे देशातील बँकिंग आणि कररचनेत आगामी काळात उद्भवणाऱ्या अडचणी दूर करणे शक्य होणार आहे,’ असेही कुमार यांनी स्पष्ट केले. स्टेट बँकेकडे सध्या पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध आहे. मात्र, ही रक्कम बाजारपेठेत खेळती ठेवण्याची आवश्यकता आहे. सध्या ग्राहक वाहनांची विशेषत: कारची खदरेदी करण्यापेक्षा ओला, उबरमधून फिरणे पसंत करीत आहेत. हा एक जागतिक कल असून, त्याला भारतही अपवाद राहिला नसल्याचेही रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या तिमाहीत ‘अच्छे दिन’ देशातील आर्थिक परिस्थितीत बदल घडविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आगामी काळात खर्च वाढविण्यात येणार असून, सणासुदीमुळे विविध क्षेत्रांतील मागणी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे. सरकारने पतपुरवठा वाढविण्यासाठी सर्व प्रलंबित देयके देण्याची घोषणा केली असून, बाजारपेठेवर त्याचाही परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे, असा विश्वास रजनीश कुमार यांनी व्यक्त केला. क्रयशक्तीमध्ये घट नाही अर्थव्यवस्थेला मरगळ आल्याने संभाव्य मंदीबाबत चिंता व्यक्त होत असताना देशातील ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये अद्याप घट झाली नसल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे. आमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांची संख्या सतत वाढत असून त्यांची क्रयशक्तीही घटलेली नाही. भविष्यात या व्यवसायात आणखी वाढ करण्याचे उद्दिष्ट आम्ही आखले आहे, असे या बँकेचे पेमेंट प्रॉडक्ट्स विभागाचे प्रमुख पराग राव यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. वाहनविक्रीमध्ये घट झाली आहे. मात्र याचा अर्थ उर्वरित क्षेत्रातील मागणी कमी झाली आहे, असे नाही. अर्थव्यवस्था अतिशय बळकट असते तेव्हाही काही क्षेत्रांची कामगिरी अपेक्षेएवढी चांगली होत नाही, असे ते म्हणाले. आमच्या बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांपैकी केवळ २५ टक्के ग्राहक नवे असून उर्वरित ग्राहक बँकेशी वर्षोनुवर्षे जोडलेले आहेत. या ग्राहकांकडून क्रेडिट कार्डांची देयके थकवण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://ift.tt/2ZqddVI

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages