मंदीचे मळभ सरले; देशभरात ३० हजार किलो सोन्याची विक्री https://ift.tt/2BOVhdU https://ift.tt/2pknqqr - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, October 27, 2019

मंदीचे मळभ सरले; देशभरात ३० हजार किलो सोन्याची विक्री https://ift.tt/2BOVhdU https://ift.tt/2pknqqr

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
वृत्तसंस्था, मुंबई मौल्यवान धातूच्या खरेदीसाठी शुभमुहूर्त मानल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात अंदाजे ३० टन झाल्याचा अंदाज आहे. विश्लेषकांच्या मते यंदा धनत्रयोदशीदिवशी अपेक्षेपेक्षा अधिक सोन्याची विक्री झाली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मरगळीचे मळभ हटत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'चे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते गेल्या काही वर्षांपपासून धनत्रयोदशीदिवशी जवळपास ४० टन सोन्याची खरेदी होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदा सोन्याचे भाव चढे राहिल्याने आणि बाजारातील अल्प तरलतेमुळे सोन्याची विक्री २० टनांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सोनेखरेदीत २५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सात हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम खरेदीवरही झाल्याचे आढळून आले. त्यामुळे धनत्रयोदशीदिनी इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होईल, असे वाटले नसल्याचे सराफ व्यावसायिकांनी स्पष्ट केले. देशांतर्गत बाजारात भाव वाढल्याने सोन्याच्या विक्रीत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. 'आर्थिक संकट आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा सोन्याच्या भावात आणि आयातशुल्कात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव वरच्या पातळीवर गेले. त्यातच आर्थिक मंदीमुळे ग्राहकांच्या हाती रोख रकमेचे प्रमाण घटले. त्यामुळे सणासुदीच्या सुरुवातालीच सोन्याच्या मागणीत म्हणावी तितकी वाढ झाली नाही. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या विक्रीने जोर पकडला असून, धनत्रयोच्या दिवशी ३० टन सोन्याची विक्री झाल्याचे नोंदविण्यात आले,' असेही मेहता यांनी नमूद केले. सोन्याचे भाव वरच्या पातळीवर असल्याने आठच दिवसांपूर्वी मेहता यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात मिळून २० टन विक्री होईल, असा अंदाज वर्तवला होता. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या विक्रीत २५ टक्के घट झाली आहे. पीएमसी बँकेचा घोटाळा समोर आल्याने बँकांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार भयभीत झाले असून, त्यांनी मौल्यवान धातूंच्या खरेदीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यात पुन्हा सोने आणि चांदीकडे त्यांचा कल वाढता असल्याचेही दिसून आले आहे. केडिया यांच्या मते आर्थिक मंदीच्या काळात सोन्यातील गुंतवणुकीवर विश्वास वृद्धिंगत झाला आहे.

https://ift.tt/2BOVhdU

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages