बँकांचे ऑनलाइन व्यवहार फेल? अफवांनी ग्राहक चिंतेत https://ift.tt/2nKBKI1 https://ift.tt/2mQC5Zr - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 2, 2019

बँकांचे ऑनलाइन व्यवहार फेल? अफवांनी ग्राहक चिंतेत https://ift.tt/2nKBKI1 https://ift.tt/2mQC5Zr

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
बेंगळुरू: खासगी क्षेत्रातल्या बँकांच्या हजारो ग्राहकांचे ऑनलाइन व्यवहार मंगळवारी फेल होत होते, त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातारवण होते. एकीकडे सुरू असलेल्या शेकडो ऑनलाइन ऑफर्स आणि पगाराचा दिवस असं सगळंच एकावेळी आल्याने ट्रान्झॅक्शन फेल होत होते. पण सोशल मीडियावरून अनेक अफवा पसरत असल्याने लोक चिंतेत होते. पीएमसी बँकेच्या ग्राहकांचे व्हिडिओ व्हायरल होत होते, त्यामुळे लोकांच्या भीतीत भर पडत होती. त्यातच यस बँक, बँक, कोटक महिंद्रा बँक आणि IDFC फर्स्ट बँकेचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन फेल होत असल्याचे मेसेज वाऱ्यासारखे पसरल्याने लोकांमध्ये घबराट पसरली. काही जणांनी याबाबत ट्विटरवरून तक्रारी केल्या. कोणी म्हणत होतं की दोन तासांपासून बँकेच्या अॅपवर एरर येत आहे. कोटक महिंद्राचं नेट बँकिंग दोन दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारीही ग्राहक करत होते. मोबाइल अॅपवर जशा तांत्रिक अडचणी येत होत्या, तशाच बँकांच्या वेबसाइटवरून लॉग इन करण्यातही अडचणी येत होत्या. आठवडाभरापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी क्षेत्रातील बँक पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेला पुढील सहा महिन्यांसाठी कोणतेही व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीमुळे लोकांमध्ये या तांत्रिक अडचणी पाहून घबराट उडाली. मंगळवारच्या तांत्रिक बिघाडानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले. काळजी करण्याची कारण नसल्याचे आरबीआयने लोकांना सांगितले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्विट करून ग्राहकांना दिलासा दिला. आरबीआयने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, 'काही ठिकाणी काही खासगी बँका तसेच सहकारी बँकांच्या व्यवहारांबद्दल अफवा पसरल्या आहेत. आरबीआय ग्राहकांना आश्वस्त करते की भारतीय बँकिंग व्यवस्था सुरक्षित आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.' पीएमसी बँकेवर कोणते निर्बंध? रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित 'पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके'वर (पीएमसी) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार या बँकेला नवी कर्जे देता येणार नाहीत आणि ठेवीही स्वीकारता येणार नाहीत. निर्बंधांमुळे 'पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके'ला आता कर्जे जारी करता येणार नाहीत. शिवाय बँकेमध्ये कोणालाही गुंतवणूक करता येणार नाही. बँकेला आपली संपत्ती विक्री करण्यावर आणि हस्तांतर करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. बँकेवर कारवाई का? बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवण्यात आली. कमी कर्ज रक्कमेचा बनावट कर्ज खात्यांचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या पैशातूनच हा सर्व गैरव्यवहार करण्यात आला. हा सर्व गैरव्यवहार करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा पुढकार होता. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून घोटाळा केला.

https://ift.tt/2nKBKI1

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages