मुंबई: कर्जाच्या बोझ्याखाली पूर्णपणे दबलेले रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा अनिल अंबानी आता कंपनीचे सांताक्रुझ येथील मुख्यालय विकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांताक्रुझचे मुख्यालय विकून किंवा लीझवर देऊन त्यातून येणाऱ्या पैशाने हजारो कोटींचे कर्ज फेडण्याचा अंबांनींचा विचार आहे. अंबांनींचे अनेक व्यवसाय तोट्यात जात असून त्यांच्यावर हजारो कोटींचे कर्ज आहे. कर्जाची रक्कम फेडण्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याचंही अंबांनींनी कोर्टात कबूल केलं होतं. पण व्यवसायातला तोटा वाढत असल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी अखेरचा मार्ग म्हणून स्थावर मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा निर्णय अंबानींनी घेतला आहे. सांताक्रुझचे मोठे मुख्यालय विकून बॅलार्ड-पियर इस्टेटमधील मुख्यालयातूनच सगळी सूत्रं हलवण्याचा निर्णय अंबांनीनी घेतला आहे. सांताक्रुझच्या मुख्यालयाची अंदाजे किंमत १५००-२०००कोटी रुपये इतकी आहे. तेव्हा ही इमारत लीझवर द्यायची की विकायची यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ञांचा सल्लाही घेणार आहे. पुढील एक वर्षांत सगळी कर्ज फेडण्याचा अंबानी यांचा विचार आहे. मुख्यालय विकणार,पण... अंबानींना जरी हे मुख्यालय विकायचे असेल तरी या मालमत्तेच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून सध्या वाद सुरू आहेत. रिलायन्सकडून वीज निर्मिती आणि वितरणाचे हक्क विकत घेणाऱ्या अदानींनी या मुख्यालयाच्या जमिनीवर दावा केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून यामुळेच ही जमिन विकणं किंवा लीझवर देणं अंबांनीना अवघड जाणार आहे.
https://ift.tt/2KRhqyA
No comments:
Post a Comment